मुरबाड मधील ESIC घोटाळा चौकशी ED च्या दालणात जाणार..!
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील जानकरांनी एका हॉस्पिटलनी ESIC मध्ये खोटी बिले तसेच जादा बिल वाढवून 7 ते 8 कोटीचा घोटाळा केला असल्याचे मत व्यक्त केले होते त्यानुसार एका तक्रारदारानी सन 2021A22 सालात केंद्रापासून राज्यस्तरावर तक्रार केली होती त्यावर चौकशी न करता सदरची तक्रार अधिकारी वर्गांनी संगामतांने धूळखात ठेवली असता त्या तक्रारीचा पाठपुरावा अखेर 2025 सालात सुरू केली असून यामध्ये काही दिवसांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी मंत्रालयाच्य दालनात आमरण उपोषणाद्वारे पुन्हा घोटाळाही शासनाच्या दालनात गेले असता त्यावर मुंबई वरळी येथून राज्य कामगार विमाचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे विभागाकडून सदर विषयावर एक समिती घटित केली होती परंतु एकाच हॉस्पिटलवर समिती गठित केल्यावर त्यांनी कोणी घोटाळा केला असा त्यांचाही संशय त्यांनी व्यक्त केला.तसेच इतर ईएसआयसी हॉस्पिटल यांचे उल्लेख त्या कागदावर केलेला नाही.त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण यापासून तक्रारदारालाच संभ्रमा पाडला आहे.
त्या गठित समितीने 3 दिवसांत चौकशी न करता अहवाल सादर न केल्याने थेट तक्रारदारालाच सुनावणीकरिता उल्हासनगर येथील ईएसआयसी कार्यालयात बोलवून 1 ते 2 तास बसवूण पुरावे कागदोपत्रीची मागणी करून संबंधित हॉस्पिटलचे आणि यांचे संगणमत असल्याने तक्रारदाराने सविस्तर माहिती दिली यातच तक्रारदारानीही खेळी करून ठेवली असता आपण ईडी तसेच एटीएस कडे चौकशी करणार आहोत त्यात येणार अहवाल आपल्याला संगणमत कसे केले आहे याचा पुरावाच मोठा असल्याने होणारी चौकशी अहवाल आपल्या विरोधातच देणार होते याची कल्पना होती.त्यानुसार प्राप्त अहवालात तक्रारदाराची बाजू दिलेला जबाबाची नोंद नमूद केली नसुन या अहवालातून सदर घोटाळा नक्कीच झाला असल्याने तक्रारदाराच्या पत्राची बाजू केलाला विषयाचा संदर्भाचा उल्लेख नाही,सदर अहवालात आज रोजीच्या सालाच्या अनुषंगाने खरेचा अहवाल खोटेच्या बाजूने चिपकवला आहे त्यामुळे काय चौकशी केली व कोणाचे म्हणणेनुसार अहवाल खरे दाखविले याबाबतचा आता सर्व ED,ATS विभाग यावर चौकशी करून ईएसआयसी च्या घोटाळयात कोण कोण सामील आहेत.
यावर ED विभाग सगळं उघडं पितळ जनतेच्या समोर आणेल यात शंका नसून याकरिता तक्रारदाराची प्रतिक्षा संपली असून काहीच दिवसांत ईएसआयसीमध्ये झालेल्या घोटाळा केलेल्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करावे व हॉस्पिटलचे लायसन्स कायमचे रद्द करून काळयायादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी तक्रारदारानी केली असून खेळी त्यांनी सुरू केली आणि संपुष्टात मी आणेल,आम्ही देखील कच्चेच व जुना तांदुळ आहोत आता भ्रष्टाचार घोटाळेबाजांना कळेल.ED विभागाकडे मुरबाडच्या ग्रामीण भागाकडून जाणारी ही पहिलीच तक्रार असून या तक्रारीमुळे अनेक अधिकारी देखील या चौकशीच्या पिंजर्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.



No comments