web-banner-lshep2024

Breaking News

3 वाजेच्या आत मुंबई रिकामी करा, अन्यथा… कोर्टाचा राज्य सरकारला दोन तासाचा अल्टिमेटम

मुंबई  : मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिली आहेत. यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे. मराठा आंदोलकातर्फे सतीश मानेशिंदे युक्तिवाद करणार आहेत. सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत. आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील. सुनावणीला सुरुवात झाली असून 3 पर्यंत मुंबई खाली करा, असे थेट आदेश आता कोर्टाने दिली आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. महादेवाची कावड घेऊन आंदोलक आझाद मैदानावर जमले आहेत. काल मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर जरांगे पाटील यांच्या कोर्ट टीमने आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनाची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या नोटीसमध्ये अनेक गंभीर आरोप आहेत.

नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की जरांगेंनी पाच हजार आंदोलकांची परवानगी घेतली असतानाही अधिक आंदोलक मुंबईत आणले. त्यांनी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर गाड्या पार्क करून जनजीवन विस्कळीत केले. आणखी लोक आणून मुंबईत चक्काजाम करण्याचा धमकीवजा इशारा दिला असल्याचा आरोपही आहे. आंदोलकांनी नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर अन्न शिजवले, कपडे काढून असभ्य वर्तन केले आणि सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण केला असेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. जरांगेंनी दिलेल्या हमीपत्रात नमूद केलेल्या अनेक बाबींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आझाद मैदान तात्काळ रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. पाच हजार आंदोलकांना घेऊनही आंदोलन करता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जरांगे पाटील यांची पुढील भूमिका आणि पोलिसांची कारवाई काय असते हे पाहणे महत्त्वाचे आहे. आज दुपारी तीन वाजता या प्रकरणाची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.

No comments